पुणे : महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाला. महाविकास आघाडीने नैतिकता पाळली असून भाजप त्याकडे दुलर्क्ष करीत आहे. भाजपला विरोधी फक्त संपवून देशात हिटलरशाही निर्माण करायची आहे. कारण ते बाबासाहेब आंबेकरांनी तयार केलेल्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सबका साथ सबका विकास म्हणजे फक्त स्वत: चा विकास करायचा असा हल्लाबोल राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपवर केला.
50 बंडखोर आमदारांसाठी भाजपने अडीच हजार कोटी आणले कुठून? राष्ट्रवादीचा सवाल
एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर न्यायालायने देखील दाखवून द्यायला हवं की, याठिकाणी फक्त बाबासाहेबांच्या सविधांनावर कायदा चालतो. परंतु जाणीवपुर्वक मानसिक खच्चिकरण करून कुटुंबावर आरोप केले जात आहे. माझ्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागला असं म्हणत अर्जून खोतकर मोठा नेता रडला. त्यांना तरी कुटुंब आहे. पण भाजपचे सारे नेते वाऱ्यावर सोडले आहेत, असा टोला देखील रूपाली पाटील लगावला.
शिंदे-फडणवीस सरकारकडून ST महामंडळाला 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर
भाजपसारखं 70 वर्षात हुकुमशाही, हिटलरशाही दंबगशाही सरकार भारतात कधीही नव्हतं. याच दरम्यानच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होताना दिसत आहे, मुळात 2008 चं प्रकरण त्यानंतर 2018 मध्ये त्यावर गुन्हा दाखल होतो. मग इतक्या दिवस इडीला कुठुन साक्षात्कार झाला? असा सवाल देखील रूपाली पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांना आता कसा काय सोनिया गांधी आणि राहुल गांधीनी भ्रष्ट्राचार केला असा माहित झालं. मला तर असं वाटतंय की मोदी साहेब त्यांच्या माऊलींच्या गर्भात होते. तेव्हा तर त्यांना कळलं नाही ना की गांधी नेहरुंनी काय भ्रष्टाचार केला आहे. त्यावरून तर आता सुरू आहे. असंही रूपाली पाटील म्हणाले.
पिंपरी- चिंचवड प्राधिकरण अन् ‘पीएमआरडीए’चा संबंधच काय? आमदार महेश लांडगे
दरम्यान, भाजपमधील नेत्यांच्या चौकशा का लावत नाही. त्यांच्या फाईल्स का बंद केल्या जात आहेत ? भाजपचे कार्यालय किती कोटी रूपयांचं झालं आहे. ते इडीला दिसत नाही का ? तसेच शिंदे गटातील जे ४० आमदारांवर झालेला खर्च तो दिसत नाही का ? असा सवाल करीत मराठी माणसाला संपवण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इऱाणीची मुलगी गोव्यात बेकायदेशीर बार चालवत आहे. ज्याठिकाणी हिंदुत्वाचे गोडवे गायले जातात. तो गोमांस स्मृती ईराणीची मुलगी गोव्यात विकत आहे. असं देखील रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also
- “भाजप हिंदुत्वाचे गोडवे गातो अन् स्मृती ईराणीची मुलगी गोव्यात गोमांस विकतेय”
- “आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत, गद्दार म्हणता तरी शांत, म्हणून काय ठार माराल का?”
- “आदित्य ठाकरेंच्या सभेचं नियोजन करणाऱ्या व्यक्तीला अटक”; सामंतांच्या गाडीवर हल्ला
- “33 दिवस झालेत, परंतु मंत्रिपदाच्या लायकीचा तिसरा माणूस अजूनही सापडलेला नाही”
- अजित पवार राज्यपालांच्या भेटीला; राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी