पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने आता ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ही निवडणुक आता बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी असं म्हटलं होतं. त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशा आशायाचं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
“भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप करू नये”; काॅंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच राज ठाकरेंना पत्र पाठवलं असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी आरोप केला आहे. यावर फडणवीस स्व अंहकाराने उमेदवार देतात व उमेदवार जिंकला की स्वत: श्रेय घेण्यास पुढे येतात आणि पराभव दिसला की इतरांना पुढे करतात. अंहकार हा खुप दिवस टिकणारा नसतो. कधी न कधी हा अंहकार नियती उतरवते. असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी लगावला आहे.
“हा वाघ बाहेर येताच पहिला वाघ नखाचा पंजा कोणाला मारणार ?”
अंधेरी पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने मतदार संघातील काही कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मतदार संघात राडा होण्याची शक्यता आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. तसेच यावेळी काही अपशब्दांचाही वापर कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Read also
- अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार..! ऋतुजा लटकेंचा मार्ग मोकळा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
- “महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं भुजबळांचं काम”; शरद पवारांकडून भुजबळांचा सन्मान
- “विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार
- “उद्धव ठाकरे अन् राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्यावं, मी आयोगाला पत्र पाठवणार”