मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे.
मोदींनी मन जिंकले : भर पावसात स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले
मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरं कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
मुंबई विमानतळाचा ताबा हा अदानी कंपनीकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका झाली होती. त्यानंतर १३ जुलै रोजी या विमानतळाचा ताबा अदानींना मिळाला. त्यानंतर अवध्या आठवड्याभरातच विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर सोमवारी दांडियाच्या गाण्यावर करण्यात आलेल्या फ्लॅशमॉबवरही टीका झाली होती.
राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का
अदानी उद्योग समूहाकडे मुंबईसह देशातील प्रमुख सहा विमानतळांचा ताबा आहे. त्यामध्ये लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरु या विमानतळांचा समावेश आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही भारताची सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी आहे, जी विमानतळांवर येणारे २५ टक्के आणि भारताच्या विमान वाहतुकीच्या ३३ टक्के नियंत्रणाखाली आहे.
Read Also :
- भाजप-राष्ट्रवादीच्या दोन युवा नेत्यांमध्ये जुंपली, फडणवीसांवरच्या टीकेला दिले ‘गावरान तुपाने’ प्रत्युत्तर
- धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
- पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न
- आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना; म्हणाले वारकरी चळवळ ही…
- राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का