मुंबई : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सातत्याने चर्चेत आले आहेत. मागील काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजवला. राज्यात ओला दुष्काळ परिस्थिती असताना देखील कृषी मंत्र्यांनी यावर वादग्रस्त वक्तव्य केेले होते. त्यामुळे ते विरोधकांच्या सातत्याने निशाणावर आले. यातच आता कृषी मंत्र्यांनी अजून एक विधान केले आहे.
मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके
पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो, कृषी मंत्री झालो. आगामी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पक्का बोकांडी आहेत. पुढील ५ वर्षासाठी पंढरपुरला मी साकडं घालायला गेलो होतो. पांडुरंग पहिलं मुसलमानाचं ऐकेल. सत्तार पांडुरंगाला जातो म्हणून त्याला गर्व आहे, मुसलमान ही पांडुरंगाला मानतो. असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
“आम्ही कधीही विकासकामांमध्ये राजकारण केलं नाही”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला
तसेच शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सिल्लोड मध्ये सभा होत आहे. त्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे हे सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि कार्यक्रमासाठी नाही, तर फोटो काढण्यासाठी येत आहेत. मला सुद्धा उद्धव ठाकरे गटावर किव येते. शिंदे निवडून न येणे हे विधान करणं म्हणजे राजकारणात इतके पागल आणि बुद्धिभ्रष्ट लोक असू शकतात याचं उदाहरण असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.
Read also
- “नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं
- “सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?
- शिंदे गटाचे 12 आमदार बाद होणार..! सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांची रणनीती, काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले..?
- “सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर
- अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क