मुंबई : राज्याच्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची चर्चा सर्वदुर पसरली. काॅंग्रेससोबत बंडाळी केल्याने डॉ. सत्यजीत तांबे यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवून विजयी झालेत. सत्यजीत तांबे यांच्यावर झालेल्या आरोपांवर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेला सर्व प्रकार उघडकीस आणला. त्यांनी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केलेत. यावरून आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केलीय.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयाने मला विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता चुकीचे एबी फार्म दिलेत. एक अमरावतीचा तर दुसरा नागपुर शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा होता. त्यामुळे आमच्या कुटुंबीयाला आणि बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र रचण्यात आला. असं सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यावर आता सुरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं
सत्यजीत तांबे यांनी काल पत्रकार परिषेद घेऊन मधल्या काळात झालेल्या सर्व राजकीय घडामोडी सांगितल्या. त्यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यावरून नाना भाऊ हे काॅंग्रेसमधील एकमेव असे नेते आहेत. जे काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं काम उघडपणे करत आहेत. असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सत्यजीत तांबे प्रकरणांवरून सध्या नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात सध्या खडाजंगी बघायला मिळत आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे.
Read also
- “ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
- “भाजपने अंधेरीत उमेदपणा दाखवला, तोच आता आघाडीने दाखवावा”, पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र
- “त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं
- “नाना पटोले ते भाजप, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे.;” सत्यजीत तांबें कुणाबद्दल काय काय म्हणाले
- “संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या