नाशिक : ज्यावेळी विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीसाठी मला चुकीचे एबी फार्म मला देण्यात आले. अर्ज सादर करण्याचा तो शेवटचा दिवस होता. त्यानंतर देखील मी काॅंग्रेसचाच उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. परंतु त्याला एबी फार्म जोडू न शकल्यामुळे तो फार्म अपक्ष म्हणून कर्नर्व्हट झाला. त्यानंतर मला बदनाम करण्याचं राजकारण सुरू आहे. जाणूनबूजून माझ्या परिवारावर गंभीर आरोप करण्यात आले. असा धक्कादायक वक्तव्य नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी बोलतांना काॅंग्रेसवर हल्लाबोल केला. मागील झालेल्या एकुणएक राजकीय घडामोडींबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगून दाखवलं.
एबी फार्मसाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दहा जानेवारीला माझा माणुस एबी फार्म घेण्यासाठी नागपुर येथील प्रदेश कार्यालयात तब्बल 10 तास बसला. अन् तो सिल पॅक एबी फार्म घेऊन आला. परंतु ते एबी फार्म ज्यावेळी फोडले, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. एक नागपुर आणि दुसरा औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे एबी फार्म मला देण्यात आले. त्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही देखील होती. चुकीचे एबी फार्म पाठवल्यानंतर काॅंग्रेसकडून याची कोणतीही माहिती समोर मांडली नाही. ही माहिती का लपवण्यात आली. ते मला काही समजलं नाही. त्यानंतर माझ्याविरोधात गंभीर आरोप लावून चुकीच्या बातम्या फसवण्यात आल्या.
“गोपीचंद पडळकराचं राजकारण फडणवीसांच्या मेहरबानीपेक्षा भुंकण्यामुळे टिकलंय”
त्यानंतर चुकीचे एबी फार्म दिल्याचं काॅंग्रेच्या वरिष्ठांकडे कळवलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला मी निवडणुक लढविणार असल्याचं सांगूनही त्यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फार्म देण्यात आले. इतकं मोठं षडयंत्र रचून आमच्या परिवाराला बदनाम कऱण्याचं काम करण्यात आलं. तसेच यामागे मोठी स्किप लिहिली गेली. आम्हाला बदनाम करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. परंतु ही गोष्टी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या कानावर घातली. यामध्ये बाळासाहेब थोरातांशीही संपर्क साधला. परंतु ते रूग्णालयात असल्याने त्यांना जास्त त्रास दिला नाही. इतंक होऊन देखील बाळासाहेब थोरातांनी मला काॅंग्रेसकडूनच लढायचं असल्याचं सांगितलं.
कसब्यात हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर..! आघाडीने कसब्याची जागा काॅंग्रेसला सोडली
इतकं होऊन देखील अर्ज दाखल करण्याची वेळ निघून जात होती. एबी फार्मची तांत्रिक अडचण बाळासाहेब थोरांताच्या कानावर घातली. त्यानंतर एच. के. पाटील यांच्याशी संपर्क साधला. परंतु वेळ निघून जात होती. यात माझ्याकडे पर्याय नसल्याने मी आखिल भारतीय काॅंग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज भरला. परंतु काही अडचण आल्याने त्याचं अपक्ष म्हणून रूपांतर झालं. त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. मला काॅंग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं काम सुरू झालं. तरीही देखील मी महाविकास आघाडीतील नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी संपर्क साधला. यात काॅंग्रेस कडे वारंवार विनंती करत होतो. त्यात त्यांनी मान्य केली. परंतु त्यांनी मला चुकी नसतांना झालेल्या सर्व गोष्टींशी माफी मागण्यास सांगितंल. त्यासाठी देखील मी तयार झालो. माझा माफीनाचा अर्ज एच. के पाटील यांच्याकडे पाठविलाही. परंतु मी एकाबाजूला दिल्लीकडे बोलत असतांना आमचे प्रदेशाध्यक्ष वेगळ्याच उमेदवारांना घेऊन फिरत होते.
Read also
- मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं
- निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शुंभागी पाटलांची नवी ईनिंग, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ प्रवेश
- आपच्या विविध शाखा अन् जनसंपर्क कार्यालयाचे हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
- “कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”
- चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप, बिनविरोध की थेट लढत ? अंतिम निर्णय महत्त्वाचा