मुंबई : भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर त्या विधानसभेसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवारही घोषीत केले आहेत. पहिल्यापासून ह्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या, अशी विनंती भाजपकडून केली जात आहे. यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीला ह्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शुंभागी पाटलांची नवी ईनिंग, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ प्रवेश
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही.
आपच्या विविध शाखा अन् जनसंपर्क कार्यालयाचे हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
“कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”
दरम्यान, महाविकास आघाडीकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता काॅंग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी घोषीत केली आहे. तर दुसरीकडे भाजपने चार वेळा नगरसेवक आणि तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले हेमंत रासने यांना आपली उमेदवारी घोषीत केली आहे. या मतदार संघात भाजपने टिळक कुटुंबीयाच्या घरात उमेदवारी न देता बाहेर दिली आहे. त्यामुळे याठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे. परंतु चिंचवडमध्ये भाजपने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आपली उमेदवारी घोषीत केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे याठिकाणी घरातच उमेदवारी दिल्याने ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
जाहीर आवाहन… pic.twitter.com/lDCH44tnk7
— Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2023
Read also
- “त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं
- “नाना पटोले ते भाजप, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे.;” सत्यजीत तांबें कुणाबद्दल काय काय म्हणाले
- “संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या
- “चुकीचे फार्म पाठवून सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसनेच घात केला..;” निवडणुकीच्या आधी सगळी स्कि्प्ट लिहिली गेली
- मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं