मुंबई : राज्याच्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकां पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुक चर्चेची ठरली. एनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीत मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यात तांबे पिता पुत्रांना काॅंग्रेसने निलंबित केले. त्यानंतर शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. परंतु या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. त्यातच सत्यजीत तांबे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यात संदर्भात आज सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत आमच्या विरोधात कशा पद्धतीने षडयंत्र रचण्याच आला. त्याची सर्व माहिती सांगितली. तसेच या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणून आलो आहे. त्यामुळे अपक्षच राहणार असल्याचं सांगून त्यांनी भाजप प्रवेशावर पुर्णविराम दिला. तसेच त्यांनी काॅंग्रेसच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप ही लावले.
“कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”
सत्यजीत तांबे म्हणाले की, काॅंग्रेस परिवारामध्ये आमच्या कुटुंबीयातील सगळ्यांनीच अगदी मनापासून काम केलं. यातच युवा संघटनेत काम करत असतांना वरिष्ठांकडे विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी मागणी करत होतो. त्यावेळी तुमचे आमदार वडील आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. असं सांगण्यात येत होतं. त्यानंतरही संघटनेत मनापासून काम करत राहिलो. त्यातच विधान परिषदच्या पदवीधर मतदार संघाची घोषणा झाली. त्यावेळीच माझे वडील डॉ.सुधीर तांबे यांनी मला ही निवडणुक लढवण्यासाठी सांगितलं. परंतु मी त्यांना नकार दिला. त्यानंतर यासंदर्भात बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे आणि माझ्या परिवारात यासंदर्भात चर्चा झाली. अन् ही निवडणुक मी लढविणार असल्याचं सांगण्यात आलं. याची माहिती वरिष्ठांकडे पोहचवली. वरिष्ठही तयार झालेत. अन् शेवटच्या तारखेला याची घोषणा करू असं ठरवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मला कोरो एबी फार्म पाठवून देण्याचं ठरवलं.
चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप, बिनविरोध की थेट लढत ? अंतिम निर्णय महत्त्वाचा
एबी फार्मसाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दहा जानेवारीला माझा माणुस एबी फार्म घेण्यासाठी नागपुर येथील प्रदेश कार्यालयात तब्बल 10 तास बसला. अन् तो सिल पॅक एबी फार्म घेऊन आला. परंतु ते एबी फार्म ज्यावेळी फोडले, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. एक नागपुर आणि दुसरा औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे एबी फार्म मला देण्यात आले. त्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही देखील होती. चुकीचे एबी फार्म पाठवल्यानंतर काॅंग्रेसकडून याची कोणतीही माहिती समोर मांडली नाही. ही माहिती का लपवण्यात आली. ते मला काही समजलं नाही. त्यानंतर माझ्याविरोधात गंभीर आरोप लावून चुकीच्या बातम्या फसवण्यात आल्या.
त्यानंतर चुकीचे एबी फार्म दिल्याचं काॅंग्रेच्या वरिष्ठांकडे कळवलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला मी निवडणुक लढविणार असल्याचं सांगूनही त्यांनी डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फार्म देण्यात आले. इतकं मोठं षडयंत्र रचून आमच्या परिवाराला बदनाम कऱण्याचं काम करण्यात आलं. तसेच यामागे मोठी स्किप लिहिली गेली. आम्हाला बदनाम करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. परंतु ही गोष्टी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या कानावर घातली. यामध्ये बाळासाहेब थोरातांशीही संपर्क साधला. परंतु ते रूग्णालयात असल्याने त्यांना जास्त त्रास दिला नाही. इतंक होऊन देखील बाळासाहेब थोरातांनी मला काॅंग्रेसकडूनच लढायचं असल्याचं सांगितलं.
इतकं होऊन देखील अर्ज दाखल करण्याची वेळ निघून जात होती. एबी फार्मची तांत्रिक अडचण बाळासाहेब थोरांताच्या कानावर घातली. त्यानंतर एच. के. पाटील यांच्याशी संपर्क साधला. परंतु वेळ निघून जात होती. यात माझ्याकडे पर्याय नसल्याने मी आखिल भारतीय काॅंग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज भरला. परंतु काही अडचण आल्याने त्याचं अपक्ष म्हणून रूपांतर झालं. त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. मला काॅंग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं काम सुरू झालं. तरीही देखील मी महाविकास आघाडीतील नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी संपर्क साधला. यात काॅंग्रेस कडे वारंवार विनंती करत होतो. त्यात त्यांनी मान्य केली. परंतु त्यांनी मला चुकी नसतांना झालेल्या सर्व गोष्टींशी माफी मागण्यास सांगितंल. त्यासाठी देखील मी तयार झालो. माझा माफीनाचा अर्ज एच. के पाटील यांच्याकडे पाठविलाही. परंतु मी एकाबाजूला दिल्लीकडे बोलत असतांना आमचे प्रदेशाध्यक्ष वेगळ्याच उमेदवारांना घेऊन फिरत होते.
हा सगळा प्रकार घडल्यानंतर निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. या निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित तसेच भाजपच्याही नेत्यांनी मदत केली. यामध्ये राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी मला पाठिंबा दिल्याने माझा विजय झाला. त्यामुळे त्या सगळ्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच मी अजूनही काॅंग्रेसमध्येच आहे. परंतु या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे यापुढेही मी अपक्ष म्हणूनच राहणार असून आता मतदार संघातील प्रश्नावर काम करणार आहे.
Read also
- “संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या
- “चुकीचे फार्म पाठवून सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसनेच घात केला..;” निवडणुकीच्या आधी सगळी स्कि्प्ट लिहिली गेली
- मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं
- निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शुंभागी पाटलांची नवी ईनिंग, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ प्रवेश
- आपच्या विविध शाखा अन् जनसंपर्क कार्यालयाचे हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन