पुणे : केंद्र सरकारने देशातील प्रमुख मुस्लिम नावं असलेल्या ऐतिहासिक स्थळाचं नाव बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच महाराष्ट्रात देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब, अफजल खानावरून वाद विवाद सुरू आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अफजल खान आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल? असा सवाल आव्हाडांनी केलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू झालीय.
चिंचवडमध्ये राहुल कलाटे विरूद्ध अश्विनी जगताप, बिनविरोध की थेट लढत ? अंतिम निर्णय महत्त्वाचा
इतर कुणी आहे म्हणून शिवाजी महाराज नाही.. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही-आम्ही सारे आहोत आणि तुमचेही आज महाराष्ट्रात अस्तित्व आहे, हे विसरू नका आव्हाड छी…लाज वाटते ..संताप वाटतो आव्हाड तुम्हाला ऐकतांना. निषेध हा शब्द सुद्धा अपुरा आहे. अशी खरमरीत टिका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितूजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुती सुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. छत्रपती महाराज आहेत, म्हणूनच तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नकतो, शेवटी जित्या ची खोड तेच खरं. असं म्हणत रविंद्र चव्हाण यांनी आव्हाडांवर टिका केलीय.
रविंद्र चव्हाण यांच्या टिकेनंतर आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. हे सगळे समजायला अक्कल लागते. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध निती कशी समजवणार. जाऊदे तुमचा दोष नाही, हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गॅंगवॉर नाही. झाकली मुठ सव्वालाखाची. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
इतर कुणी आहे म्हणून शिवाजी महाराज नाही..
छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही-आम्ही सारे आहोत आणि तुमचेही आज महाराष्ट्रात अस्तित्व आहे, हे विसरू नका आव्हाड
छी…लाज वाटते ..संताप वाटतो आव्हाड तुम्हाला ऐकताना…
निषेध हा शब्द सुद्धा अपुरा आहे….@Awhadspeaks @Dev_Fadnavis pic.twitter.com/OuCyhSKdzK— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 4, 2023
Read also
- “चुकीचे फार्म पाठवून सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसनेच घात केला..;” निवडणुकीच्या आधी सगळी स्कि्प्ट लिहिली गेली
- मामा भाच्याला अडचणीत आणण्यासाठी मोठा षडयंत्र, सत्यजीत तांबेंनी सगळं पितळ उघड पाडलं
- निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शुंभागी पाटलांची नवी ईनिंग, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवसेनेत’ प्रवेश
- आपच्या विविध शाखा अन् जनसंपर्क कार्यालयाचे हरीभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन
- “कसब्याच्या उमेदवारीवरून शैलश टिळक भाजपवर नाराज, खंतही व्यक्त करून दाखविली”