मुंबई – ऐनवेळी काँग्रेसचे विधानपरिषदेचा उमेदवार बदलल्यामुळे भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला . इतकेच नाही भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून त्यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला.
निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय होणार?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
नाना पटोले यांनी दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन काँग्रेसचा उमेदवार बदलला असा आरोप बावनकुळे यांनी केला. यावर मी कुणाच्या दबावात येत नाही तर दबाव टाकतो, असे पटोले म्हणाले आहेत. तसेच ज्यांनी हा आरोप केला. त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलो. हे त्यांनी विसरू नये, अशा शब्दात पटोले यांनी बावनकुळे यांना फटकारले आहे. आमच्यावर टीका करणारे आणि आपला राजीनामा मागणारे चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत? असा उलट सवालही पटोले यांनी उपस्थित केला.
दरम्यान आगामी निवडणुकांवर देखील पटोले यांनी आपले मत मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर अनेकांनी बहिष्कार घातला. जनहित लक्षात घेता या निवडणुका रद्द कराव्यात,अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले म्हणाले.
Read Also :
- भाजपच्या 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, अधिवेशनालाही हजर राहता येणार नाही
- विलास लांडे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होणार.!
- मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- शिवसेना सचिव नार्वेकरांचा अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
- ९६ मतं फुटली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनोदवीर ठरले; आशिष शेलारांनी नाना पटोलेंची उडवली खिल्ली