नागपूर : नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. यानंतर एकीकडे बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधला असताना दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात हे गणित चुकीचं असल्याचं या विजयानं स्पष्ट केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या विजयापेक्षाही जास्त आनंद झाल्याचं म्हटलं आहे. “आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असं मांडलं जात असलेलं गणित चुकीचं आहे हेही या विजयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं फडणवीस म्हणाले.
‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात मिळवलेला विजय म्हणजे नेव्हर गो बॅक असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकांवेळी बावनकुळेंना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांना बाजूला सारल्याची बरीच चर्चा झाली होती. विधानपरिषद निवडणुकांच्या माध्यमातून त्यांचं कमबॅक झाल्याचं बोललं जात आहे. त्यावर फडणवीस बोलत होते. “ही लेजिस्लेटिव्ह गॅप होती, पक्षात नव्हती. पक्षात दोन पदं सर्वोच्च असतात. त्यातल्या महामंत्रीपदावर बावनकुळे होते. लेजिस्लेटिव्ह पार्टीत हा कमबॅक आहे. तो नेव्हर गो बॅक असा कमबॅक आहे. भाजपा नागपुरात मजबूत आहेच. पण बावनकुळेंच्या विजयामुळे विदर्भातल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.
अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव
दरम्यान, या निवडणुकीपूर्वी ऐन वेळी छोटू भोयर यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला. त्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “भोयर यांना मिळालेलं एक मत त्यांचं स्वत:चं आहे. ते काँग्रेसमध्ये गेले, ही त्यांची पहिली चूक. तिथे गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली, त्यामुळे त्यांना हे जाणवलं. त्यांनी स्वत:चं मत देखील काँग्रेसला दिलं नाही, स्वत:ला दिलं आहे”.
Read Also :
- शिवसेना सचिव नार्वेकरांचा अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
- ९६ मतं फुटली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनोदवीर ठरले; आशिष शेलारांनी नाना पटोलेंची उडवली खिल्ली
- विजयाचा भावूक क्षण: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले
- महापालिका पोटनिवडणुक: खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात होणार “कांटे की टक्कर”
- गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत अजून तरी कसलाही विचार नाही – संजय राऊत