मुंबई: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी नानांना दिला.
हे पण वाचा: शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
हे पण वाचा: “मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण
संजय राऊत यांना नाना पटोलेंच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटत नाही. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन विधान केलं असं वाटत नाही. राजकारणात पाळत ठेवणं याचे खूप वेगवेळे संदर्भ असतात. मलाही सरकारची सुरक्षा आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षेची माहिती घेतली जाते. आपण कुठे जातो? काय करतो? कुठे गेल्यामुळे धोका आहे? एखाद्या अतिविशिष्ट व्यक्तिला सुरक्षा दिल्यानंतर त्याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात.
हे पण वाचा: नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर, कुणाला कोणती मिळाली कमिटी; वाचा सविस्तर
हे पण वाचा: ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
नाना पटोले हे अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाचं फार गांभीर्याने घेऊ नये. आम्ही सुद्धा घेत नाही. अशी विधानं होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम करावं, असा सल्ला राऊत यांनी दिला.
हे पण वाचा: केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
अजित पवार नाना पटोलेंवर नाराज
“नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे. पटोले हे नेते नाहीत किंवा मंत्रीही नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांची भूमिका महाविकास विकास आघडीला कमकुवत करण्याची आणि अडचणीत आणणारी आहे. त्यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे.