मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्यानंतर आता कॅबिनेट कमिट्यांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. कॅबिनेट कमिट्यांमध्ये नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. नारायण राणेंपासून ते मनसुख मंडवियांपर्यंत अनेक मंत्र्यांना कॅबिनेट कमिट्यांवर घेण्यात आले आहे.
हे पण वाचा: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लगावले महाविकास आघाडी आणि भाजपला ‘मार्मिक’ टोले, वाचा सविस्तर
हे पण वाचा: शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
इन्व्हेन्सटमेंट अँड ग्रोथ कमिटीमध्ये नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असते. तर रोजगार आणि स्किलशी संबंधित कमिटीमध्ये धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपदही पंतप्रधानांकडे आहे.
हे पण वाचा: “मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण
हे पण वाचा: आत्ता लोकसेवा करण्याची वेळ, मंत्रीपद मागण्याची नाही, पंकजा मुंडेच्या उपस्थितीत मोदींनी सुनावले खडे बोल
स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांचा समावेश
हे पण वाचा: पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
पार्लिमेंट्री अफेयर्सच्या कॅबिनेट कमिटीत अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या कमिटीचे अध्यक्षपद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. तर पॉलिटिकल अफेयर्सशी संबंधित कमिटीत स्मृती ईराणी, सर्वानंद सोनोवाल, गिरीराज सिंह, मनसुख मंडविया, भूपेंद्र यांचा समावेस करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष आहेत.
मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर फेरबदल
मंत्रिमंडळाचा विस्तार करताना १२ केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामे दिले होते. त्यामुळे अनेक समित्यातील पदे रिक्त झाली होती. त्यामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.