मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांनाही मोदींनी खडे बोल सुनावले. सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई पडली आहे. परंतु आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपद मिळालं नसल्यानं नाराज असलेल्या नेत्यांना मोदींनी चांगल्याच काचपिचक्या दिल्याची चर्चा रंगलीय.
हे पण वाचा: ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव सांगितले पाहिजे, आशिष शेलारांच्या टीकेला नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर
हे पण वाचा: “मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही मनसेसोबत नाही”, भाजपची स्पष्ट भूमिका
प्रीतम मुंडे यांना केंद्रात स्थान मिळालं नसल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान योगायोगानं भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली. त्यात मोदींनी या महत्त्वाकांक्षी नेत्यांना कानपिचक्या दिल्या. या बैठकीला अध्यक्ष जे पी नड्डा बी एल संतोष, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर, सुनिल देवधर उपस्थित होते.
हे पण वाचा: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; २०२२ला भाजपची सत्ता येणार?
राजकारणात संयम बाळगला नाही, तर कितीही मोठा नेता असला तरी त्याचं राजकारण संपत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित नेत्यांची कानउघाडणी केली. राजकारणात संयम किती महत्त्वाचा आहे, हे उदाहरण देताना पंतप्रधान मोदींनी तीन नावांचा उल्लेख केला.
हे पण वाचा: “आधी माहिती घ्या, मग आरोप करा,” राष्ट्रवादीचाही नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल
पहिले म्हणजे शंकरसिंग वाघेला, दुसरे मदनलाल खुराणा आणि तिसरे कल्याण सिंग. या तिघेही राजकीय आखाड्यात कसलेले होते. दूरदृष्टी होती.. लोकनेते होते. परंतु फक्त संयम सुटला त्यामुळे तिघांचंही राजकारण संपल्याचं मोदी म्हणाले. मंत्रीपदाला नव्हे तर लोकसेवेला प्राधान्य द्या, असा कानमंत्रही मोदींनी दिला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट रोख पंकजा मुंडे यांच्याकडेच असल्याची चर्चा बैठकीनंतर पदाधिकाऱ्यात सुरू झाली.
एकूण ११ राष्ट्रीय सचिवांचा सोशल मीडिया रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हातात घेऊन बसले होते. एकूण २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले होते. त्यावर कोणकोणते नेते ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्यक्त झाले आहेत. याची इत्यंभूत माहिती मोदींकडे होती. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. पंकजा मुंडे यांचा नंबर आल्यावर, ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता. ‘लोकल’ मुद्द्यावर पण खूप बोलता. पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकल पेक्षा राष्ट्रीय मुद्द्याकडे जास्त लक्ष द्या,’ असा सल्ला मोदीजींनी दिला. परंतु, हे सांगताना मोदीजींनी.. तुम्ही खूप बोलता या शब्दावर जोर दिला. त्यामुळे सर्वांनाच त्याचा अर्थ कळाला.
.