मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
“आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे आणि मी त्यांना तसे आश्वासन देऊन परतलो आहे; पण हे मला सुखानं जगू देणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, गृहखातंदेखील त्यांच्याकडे आहे आणि ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. त्यांना जाणीव होतीये की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे, मी कुठं सभा घेतली, दौरे केले याची सगळी माहिती घेतली जाते, याचा तिन्ही पदांना देण्याचा आदेश आहे. तसेच माझ्यावर आयबी कडून पाळत ठेवली जात आहे”, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“मी बोललो, पण काही चुकीचं बोललो नाही; माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे”
दरम्यान, राष्ट्रवादीकडून यावर सर्वात पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली गेली असून, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, “त्यांनी केलेले आरोप हे माहिती अभावी केले असून, सरकार कोणतंही असो, अशा पद्धतीने, सुरक्षेच्या दृष्टीने गृहखातं माहिती गोळा करत असतं. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर त्यांचं लक्ष असतं. पटोले यांनी त्यांच्याच पक्षातील अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांना विचारून, त्यांच्याकडून याबाबतची माहिती घ्यावी,” असा हल्लबोल त्यांनी केला आहे.
Read Also :
- मोदी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत; ६ ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!
- कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा – संभाजी भिडे
- “शिवसेना-भाजप युती होऊ शकेल असं वाटत असेल तर आधी…” नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”