मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
अजित पवार नाना पटोलेंवर नाराज, संतापून केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाले…
“आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले आहे; महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे आणि मी त्यांना तसे आश्वासन देऊन परतलो आहे; पण हे मला सुखानं जगू देणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, गृहखातंदेखील त्यांच्याकडे आहे आणि ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. त्यांना जाणीव होतीये की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. त्यामुळे, मी कुठं सभा घेतली, दौरे केले याची सगळी माहिती घेतली जाते, याचा तिन्ही पदांना देण्याचा आदेश आहे”, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
“ठाकरे सरकारमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे आता बाहेर येऊ लागलंय”
दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी, आपल्या वक्तव्याचा कसा विपर्यास झाला, याबाबत खुलासा केला आहे. “मनगढत कहाण्या रचून महाविकास आघडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव सुरू आहे. पण तो कधीही यशस्वी होणार नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.
“पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेने शिवसेना-राष्ट्रवादीला अन्नपाणी नको झालंय”
“मी पुण्यात असताना, स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. तेव्हा मी, “दौरे सुरू आहेत, काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, या सगळ्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो, केवळ तिथेच नाही तर, केंद्राकडेही जातो. आपल्या पक्षाबाबतीत, सर्व घडामोडींची माहिती या दोन्ही ठिकाणी असते; माझीच नाही तर, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचीही माहितीही असते. रोज प्रत्येक विभागाची, जिल्ह्याची माहिती याठिकाणी जाते. हे सगळं मी अत्यंत सहजपणे बोललो. मात्र त्याच विपर्यास केला गेला,” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
तसेच, आमचा भाजपला विरोध आहे. त्यामुळे हे सरकार ५ वर्षे चालेल. त्यांचा हे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळेच या मनगढत कहाण्या पसरवल्या जात आहेत. या सरकारमध्ये कोणतीही गडबड नाही, नाराजी नाही. आमचा सगळा कारभार एकत्र आणि व्यवस्थित सुरू आहे. मी बोललो हे खरं आहे, पण मी राज्य सरकारला नाही, केंद्राला म्हटलं होतं,” अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
Read Also :
- “शिवसेना-भाजप युती होऊ शकेल असं वाटत असेल तर आधी…” नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
- पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!