नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
“शिवसेना-भाजप युती होऊ शकेल असं वाटत असेल तर आधी…” नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
“आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले आहे; महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे आणि मी त्यांना तसे आश्वासन देऊन परतलो आहे; पण हे मला सुखानं जगू देणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, गृहखातंदेखील त्यांच्याकडे आहे आणि ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. त्यांना जाणीव होतीये की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. त्यामुळे, मी कुठं सभा घेतली, दौरे केले याची सगळी माहिती घेतली जाते, याचा तिन्ही पदांना देण्याचा आदेश आहे”, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
दरम्यान, यावर आता भाजपचे नेते, आमदार आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, “नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेने राष्ट्रवादी- शिवसेनेला कापरं भरलेलं आहे. त्यांना अन्नपाणी जात नाहीये, अर्थात असं नाना पटोलेंच्या बोलण्यावरून दिसतंय. ते इतके का घाबरले आहेत, हे त्यांनी सांगावे”, असं सवाल त्यांनी राष्ट्रवादी-शिवसेनेला केला आहे.
Read Also :
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
- उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? राऊत यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा