सिंधुदुर्ग : सातत्याने भाजपकडून शिवसेना आणि शिवसेना नेत्यांवर आगपाखड करणारे, भाजप आमदार आणि नेते नितेश राणे यांच्या बोलीत, शिवसेनेबद्दल एकाएकी नरमाई आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काल, सिंधुदुर्गमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सागररत्न’ बाजपारपेठेच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी, मध्ये राणेंनी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले.
पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
“राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिला तर, खांद्याला खांदा लावून काम करू. राज्यात सातत्याने युतीची चर्चा होत असते, मात्र काही दिवसांपासून ती बंद होती. आता या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा ती सुरु होईल. आज युतीचे चाहते सुखावले असतील. त्यांना रात्री चांगली झोप लागेल”, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
दरम्यान, यानंतर यावर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी घेतलेली, “विकासात सर्वांनी एकत्र असलं पाहिजे”, ही भूमिका मान्य आहे, पण त्यांना, “युती होऊ शकेल” असं वाटत असेल तर, त्यांनी प्रतिविधानसभेतील त्यांच्या नेत्यांची वक्तव्ये त्यांनी पाहावीत”, असं प्रत्युत्तर दिलं आहे.
Read Also :
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
- उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? राऊत यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे