पुणे : आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला, राज्यभरात सुरुवात झाली आहे. पुण्यातून या अभियानाला उर्मिला मातोंडकर आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना ऊर्मिला यांनी, “१२ आमदारांच्या यादीवर, मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरा आहे, पण आमदारकी मिळाली तर आनंदच आहे”, असं भाष्य केलं आहे.
पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत ऊर्मिला मातोंडकर यांचेही नाव आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आमदारकी मिळावी, अशी आपली इच्छा त्यांनी, पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. तसेच, “मी पुण्यात ४ दिवसांचा दौरा केला, तेव्हा कुणालाही काही सांगितलं नव्हतं; नाहीतर काही नेते एक केळ देतात आणि चार फोटो काढून, समाज माध्यमांवर टाकतात”, असं म्हणत इतर पक्षीय नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
तसेच, “लव्ह जिहादला आपल्या राज्यात थारा दिला जाणार नाही. ‘अन्याय’, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, त्याला विरोध हा व्हायलाच हवा आणि तो शिवसेनेकडून कुणी करत असेल, तर मी त्यांनाही विरोध करेन. या सर्व गोष्टींचा फायदा केवळ आणि केवळ राजकीय कारणासाठी होतो”, असं मत त्यांनी मांडलं आहे. सचिन वाझे आणि माजी वनंमंत्री संजय राठोड यांच्यावर बोलताना त्यांनी, ” ही प्रकरणे न्यायालयात असल्याने, यांवर बोलणं योग्य नाही. आपण कामाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून, भलत्याच गोष्टींवर लोक बोलतात”, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
यावेळी, “राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीने महामारी काळात जेवढं उत्तम काम केलं असेल, त्यापेक्षा जास्त उत्तम काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, त्याची पावतीही घराघरांतून मिळालेलं प्रेम पाहून, त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या योग्य नियोजनामुळे ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या पदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांना, अत्यंत कठीण काळाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे श्रेय देऊ द्यात किंवा नको देऊ द्यात; पण देशात सर्वोत्त काम त्यांनी केलं आहे. इतरांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात वेळ न वाया घालवता, त्यांनी फक्त विकासावर लक्ष केंद्रीत केलं,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.
Read Also :
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
- कोल्हापूर जिल्हा परिषद: पुत्रप्रेम जिंकणार की, एक कार्यकर्ता अध्यक्ष होणार?
- जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवलेंची मोठी मागणी
- तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप