मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली आहे. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करा – डॉ. अनिल बोंडे
रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी ही मागणी केली. जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असं आठवले म्हणाले.
“महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात सर्वकाही सोयीनुसार घडते ; मोदी सरकारच्या नव्या सहकारमंत्र्यांचे शिवसेनेकडून स्वागत
जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असं सांगतानाच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र, सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असंही ते म्हणाले.
Read Also :
- तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप
- “सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत नाही आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना!”
- संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
- शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया
- सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही