पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
“महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे’ असे पटोले म्हणाले आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात. शिवसेनेला कामाला लागा म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले चालते. मी स्वबळाची भाषा बोलू लागलो, तर त्रास होतो. हे योग्य नाही. स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे”, असे मतही त्यांनी या कार्यक्रमात मांडले होते.
सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी @CMOMaharashtra आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. हा फक्त कांग्रेस प्रदेशाध्यक्षांचा नव्हे तर संपूर्ण कांग्रेस पक्षाचा अपमान आहे. कांग्रेस आता सत्तेतून बाहेर पडून आत्मसन्मान राखणार का…?@NANA_PATOLE pic.twitter.com/VRiHTx9Fdj
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 12, 2021
तसेच, “पुण्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत. अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करत नाहीत. यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो. पण, शेवटी त्यांचं ऐकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात”, अशी उघडपणे टीका त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केली होती..
पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
दरम्यान, यावर आता भाजप नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत असून, “सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. हा फक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेस पक्षाचा अपमान आहे. काँग्रेस आता सत्तेतून बाहेर पडून आत्मसन्मान राखणार का…?”, असा सवाल भाजप नेत्या आणि आमदार श्वेता महाले यांनी केला आहे.
Read Also :
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? राऊत यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा