मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
“पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेने शिवसेना-राष्ट्रवादीला अन्नपाणी नको झालंय”
“आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले आहे; महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे आणि मी त्यांना तसे आश्वासन देऊन परतलो आहे; पण हे मला सुखानं जगू देणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, गृहखातंदेखील त्यांच्याकडे आहे आणि ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. त्यांना जाणीव होतीये की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. त्यामुळे, मी कुठं सभा घेतली, दौरे केले याची सगळी माहिती घेतली जाते, याचा तिन्ही पदांना देण्याचा आदेश आहे”, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
"महाविकास आघाडी सरकारमध्ये किती अविश्वासाच वातावरण आहे!" हे आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वक्तव्यांवरून दिसून येतं! pic.twitter.com/CZ09ZytQPn
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 12, 2021
दरम्यान, यावर आता भाजपचे नेते, आमदार आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी, ट्विट करून महाविकास आघाडीवर निशाणा साधला असून, “पटोलेंनी जे वक्तव्य केलं, त्यावरून महाविकास आघाडीत किती मतभेद आहेत आणि किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे आता बाहेर येऊ लागलं आहे,” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“शिवसेना-भाजप युती होऊ शकेल असं वाटत असेल तर आधी…” नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
तसेच, “एकीकडे हे एक असल्याचं दाखवतात आणि दुसरीकडे तेच एकमेकांवर आरोप करत आहे, संपूर्ण महामारीच्या काळात या महाविकास आघाडीने काहीही काम केलं नाही. केंद्राने यांना मदत केली. यांना यांच्या भांडणातूनच वेळ मिळत नाही. आता पटोले यांच्या वक्तव्यातूनच राज्यातल्या जनतेला सगळं काही समजून जाईल. इथे प्रश्न त्यांच्यातल्या मतभेदांचा नाहीये, इथे प्रश्न हा आहे की; हेच एकत्र नाहीयेत तर हे जनतेला काय न्याय देणार?,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
- उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? राऊत यांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर