मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवली आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
“ठाकरे सरकारमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे आता बाहेर येऊ लागलंय”
“आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी सांगितले आहे; महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे आणि मी त्यांना तसे आश्वासन देऊन परतलो आहे; पण हे मला सुखानं जगू देणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, गृहखातंदेखील त्यांच्याकडे आहे आणि ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. त्यांना जाणीव होतीये की, महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. त्यामुळे, मी कुठं सभा घेतली, दौरे केले याची सगळी माहिती घेतली जाते, याचा तिन्ही पदांना देण्याचा आदेश आहे”, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी माझ्यावर पाळत ठेवली; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
दरम्यान, नाना पटोलेंच्या या वक्तव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत असून, संतापलेल्या अजित पवारांनी नाना पटोलेंची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे समजते आहे.
“पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेने शिवसेना-राष्ट्रवादीला अन्नपाणी नको झालंय”
“नाना पटोलेंची भूमिका महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे. पटोले हे नेते नाहीत किंवा मंत्रीही नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांची भूमिका महाविकास विकास आघडीला कमकुवत करण्याची आणि अडचणीत आणणारी आहे. त्यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे. तसेच, या भूमिकेबाबत मविआचे नेते काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
Read Also :
- कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा – संभाजी भिडे
- “शिवसेना-भाजप युती होऊ शकेल असं वाटत असेल तर आधी…” नितेश राणेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
- पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम