मुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमात मोठं मान अपमान नाट्य रंगताना पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप प्रामुख्याने राणे कुचुंबीय यांच्यामध्ये आता या विमानतळाच्या श्रेयवादावरून चांगलीच चढाओढ पहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि मंत्रीमंडळातील प्रमुख मंत्री ज्या एलाइंस एअर च्या पहिल्या प्रवासी विमानाने चिपी विमानतळावर दाखल होणार होते. त्याच विमानाने केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील येणार होते तसं नियोजित होतं मात्र आता त्या विमानाने येण्याच राणें यांनी टाळंल आहे.
प्रत्येक गोष्टीची नोंद होतेय, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांच सुचक वक्तव्य
नारायण राणे यांनी एकत्र प्रवास करण्याचं टाळल असून त्या एवजी राणे आणि राज्यातील भाजपचे आमदार पदाधिकारी चाटर्ड विमानाने चिपी विमानतळावर दाखल होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमापूर्वीच टोकाचं राजकारण आणि मानपमान नाट्य चिपी विमानतळावर पहायला मिळतंय.
…अन् लोकांनी भाजपला येडी ठरवलं; ‘तो’ किस्सा सांगताना शरद पवारांना गुदगुल्या
दरम्यान एकमेकांच्या कट्टर विरोधक असणारे शिवसेना नेते आणि राणे कुटुंवीय आज शेजारी बसणार आहेत कारण त्यांच्या खुर्च्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या पध्दतीने लावल्या आहेत. नितेश राणेंच्या बाजूला वैभव नाईक तर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे बाजूला आहेत अशा प्रकारे ते बसणार असल्याने आजच्या कार्यक्रमाकडे संपुर्ण राज्याची नजर लागून राहीलेली आहे.
Read Also :
- अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे
- जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली आहे; गोपीचंद पडळकर कडाडले
- मोठी बातमी: शिवसेना स्वबळावर लढणार; राष्ट्रवादीला धक्का, काँग्रेस-भाजपलाही टक्कर देणार
- राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
- वादाची ठिणगी: संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली नोटीस; म्हणाले, माफी मागा, अन्यथा…