अकोला : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय पक्षातील विविध नेतेमंडळी यावर भाष्य करताना दिसत आहे. आता मराठा आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडून मराठा व ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या इच्छाशक्तीच्या अभावी मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्यामुळं हे आरक्षण रद्द झालं, अशी जोरजार टीका नरेंद्र पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली.
नरेंद्र पाटील म्हणाले की, जोपर्यंत बाळ रडत नसतं, तोपर्यंत आई देखील त्याला दुध पाजत नाही. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजा मोर्चे, आंदोलनं करणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी सरकारला आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारचे डोळे उघडणार नाहीत. राठा समाज हा लढा लोकशाही पद्धतीने उभारणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
Read Also :
- ‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला
- पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’
- मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा
- अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी