पुणे : पुण्यात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आराखडा नुकताच जाहीर करण्यात आहे. यानंतर एक प्रकारे निवडणुकीचा बिगुल वाजले आहे.
शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
महानगरपालिका प्रारूप रचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामधे चांगलाच वाद निर्माण झालेला पाहायला मिळाला आहे. प्रारूप रचनेवरून भाजपचेच नुकसान जास्त करण्यात आले आहे असं देखील म्हटलं जातं आहे. भाजपचं जरी काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरीदेखील चर्चा मात्र राष्ट्रवादीच्या गोटातून जास्त सुरु आहे अशी सद्य परिस्थिती समोर आली आहे. पुण्यातील प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही रचना राष्ट्रवादीला अनुकूल आहे, आमचे १२२ नगरसेवक स्वबळावर निवडून येतील, असा दावा केला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक नको असा सल्ला राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी दिला आहे.
राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
प्रारूप रचनेनंतर आठवड्याभरातच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची चलबिचल वाढली आहे. प्रमुख नगरसेवकांनी आपापले वॉर्ड सुरक्षित केले आणि आम्हाला विचारात घेतलं नाही आणि आमचा विचार झालाच नाही अशी चर्चा देखील काही नगरसेवकांची दबक्या आवाजात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे आमदार, प्रमुख नगरसेवक, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेतली होती. बहुतांश जणांनी प्रभाग रचनेवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीसाठी प्रभाग रचना सुरक्षीत असल्याचे सांगितले तरी ती कशाप्रकारे चुकीची आहे हे पदाधिकाऱ्यांनी आकड्यांनिशीच सांगितले आहे.
Read also:
- म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट
- आपल्या विचारांतून आपले संस्कार आणि संस्कृती दिसते; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना टोला
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत आधीच मारामारी; त्यात कशी निभावेल भाजपातील नाराजांची शिरजोरी?
- शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर