जळगांव : ‘आपल्या विचारांतून आपले संस्कार आणि संस्कृती दिसते आणि ते महाराष्ट्र पाहात आहे. अमृता फडणवीस सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याविषयी जनतेच्या मनात द्वेष निर्माण व्हावा, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करून खतपाणी घालत असतात,’ अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. जळगावात तक्रारींच्या जनसुनावणीसाठी चाकणवर उपस्थित होत्या.
ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश
महिलांविषयी एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पुन्हा जर काही वादग्रस्त वक्तव्य केलं तर राजकीय पुढारी असो किंवा इतर कुणीही व्यक्ती असो त्यांच्यावर थेट महिला आयोग गुन्हा दाखल करेल, असा इशाराही चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला आहे.
मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांना कोविड सुपर स्प्रेडर म्हणणं हे धक्कादायक – सुप्रिया सुळे
‘राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं समोर आलं होते. राज्य महिला आयोगाकडून त्यांना नोटीसही पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांचा माफीनामाही प्राप्त झाला. महिलांविषयी अनेक कायदे आहेत, मात्र त्यानंतरही अशा पद्धतीने आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणजे त्यांच्या संस्कार व संस्कृतीचा भाग आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला तडा जाणार नाही असे वर्तन करू नये,’ असं आवाहनही चाकणकर यांनी केलं आहे.
Read also:
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत आधीच मारामारी; त्यात कशी निभावेल भाजपातील नाराजांची शिरजोरी?
- शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
- राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
- शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
- म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर