पिंपरी चिंचवड : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपामधील मोठा गट राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर आहे. परंतु, सत्ता…संधी आणि संघर्ष…अशा आव्हानांचा सामना करणाऱ्या राष्ट्रवादीत आधीच मारामारी आणि त्यात भाजपाच्या नाराजांच्या शिरजोरीची कसा निभाव लागेल? असा सवाल उपस्थित झाला आहे.
स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच गोव्याच्या विकासाचे शिल्पकार – देवेंद्र फडणवीस
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेची गणिते भाजपाचे दोन्ही आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्याभोवती फिरतात. भाजपाच्या स्थानिक पातळीवर दोन्ही आमदारांकडे निर्णय घेण्याचे सामर्थ्य आहे. किंबहूना, राज्यातील पक्षश्रेष्ठींनी दोन्ही आमदारांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
पुन्हा भिर्रर्र… आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळरावांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन
भाजपाकडून संभाव्य उमेदवार अगदी दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झालेले आहेत. आरक्षण आणि प्रभाग रचनेचे गणित निश्चित करून संबंधित उमेदवाराच्या घरी ‘एबी फॉर्म’येतात. पक्षातून स्थानिक पातळीवर ताकदही दिली जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे ‘वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी’काहीजण राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मात्र, राष्ट्रवादीला आपल्या नव्या पिढीला राजकारणात आणायचे आहे. लोकसभा निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर विचार केला असता, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे सुपूत्र विक्रांत लांडे यांच्यानंतर विराज लांडे यांना ‘सेट ’करायचे आहे. माजी महापौर आझम पानसरे यांचा मुलगा निहाल पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचा मुलगा ऋषिकेश वाघेरे- पाटील, माजी महापौर योगेश बहल यांचा मुलगा विरेंद्र बहलअशी अनेक उदाहरणे देता येतील. अशी घराणेशाही यशस्वी करण्यासाठी वरपासून खालीपर्यंत कामाला लागली आहे, अशा परिस्थितीत भाजपात संधी मिळाली नाही म्हणून राष्ट्रवादीत उडी मारणाऱ्यांची नौका कशी किनाऱ्यापर्यंत पोहोचणार? हा संशोधनाचा विषय आहे.
बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत
वास्तविक, राष्ट्रवादीत तिकीटापासून प्रदेश नेतृत्वावर अवलंबून रहावे लागते. स्थानिक पातळीवर आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी नेत्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्यानंतर उपमुख्मयंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि बहुदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या माध्यमातून तिकीटासाठी ‘फिल्डिंग’लावावी लागते. अनेकांना तिकीटासाठी कुणाकडे पाठपुरावा करावा, याचा संभ्रम असतो. मग, वाहत्या गंगेत हात धुण्याच्या मानसिकतेतून भाजपातील बंडखोरांचा निभाव कुठे आणि कसा लागणार? असा प्रश्न आहे.
बंडखोरांना आपली निष्क्रीयता झाकायची आहे का?
भाजपामधील नाराज नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत आहेत. संधी मिळाली नाही. पदवाटपात स्थान दिले नाही, असा दावा केला जात आहे. मात्र, भाजपातील ‘त्या’नगरसेवकांना आपली निष्क्रीयता झाकायची आहे, असे दिसते. आपल्या अपयशाचे खापर भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर फोडून राष्ट्रवादीच्या गंगेत पवित्र होण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, ज्या राष्ट्रवादीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते. तिकीट मिळवण्यासाठी मारामारी करावी लागणार आहे. त्याठिकाणी संधी मिळणार का? हा चिंतनाचा विषय आहे. वास्तविक, तिकीटासाठी करावा लागणार संघर्ष हा अगदी शेवटपर्यंत करावा लागतो. अनेकांच्या पायऱ्या झिजवून मिळालेल्या तिकीटानंतर निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी एकट्यानेच लढा द्यावा लागतो. निवडून आल्यानंतर पुन्हा पदवाटपात रांगेत उभा रहावे लागणार, हे निश्चित आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना पहिल्यांदा स्थायी समिती सभापतीपदी संधी देण्यासाठी १२ वर्षे संघर्ष करावा लागला. तसेच, आमदार लक्ष्मण जगताप यांची क्षमता असताना १५ वर्षे सत्तेच्या काळात मंत्रीपद मिळाले नाही. त्या राष्ट्रवादीत दाखल झाल्यावर महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता अशी मानाची पदे मिळतील, अशी स्वप्ने पाहणे अतिउत्साहाचे ठरणार आहे.
लांडगे-जगतापांचा तिकीट वाटप फॉर्म्युला निश्चित…
राष्ट्रवादी स्थानिक, प्रदेश पातळीवर नेत्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आणि युती-आघाडीच्या समीकरणावर अवलंबून असताना भाजपाचे दोन्ही आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांचा तिकीटाचा फॉर्म्युला निश्चित झालेला असतो. दोन-तीन महिने अगोदर संभाव्य उमेदवार निश्चित झाले आहेत. २०१७ मध्ये निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीच भाजपाच्या उमेदवारांनी काम सुरू केले होते. त्यावेळी ८० टक्के उमेदवारांना दिलेला शब्द पाळण्यात लांडगे-जगताप यशस्वी झाले. पदवाटपातही दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांना दिलेला शब्द ९० टक्के पाळला आहे. एक-दोन अपवाद वगळता प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मग, राष्ट्रवादीत जाणाऱ्यांना काय हासील होणार? असा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीत न्याय मिळणार काय?
पदवाटपात भाजपामध्ये अन्याय झाला, असा दावा करीत काहींनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली आहे. मग, राष्ट्रवादीत गेल्यावर न्याय मिळणार का? याचा विचार करणे अपेक्षीत आहे. भाजपातून नाराज होवून रवि लांडगे, वसंत बोराटे, अश्विनी जाधव, संजय नेवाळे, तुषार कामठे, संतोष बारणे आदींसह २० ते २२ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, असे बोलले जाते. मग, अजित गव्हाणे यांना विधानसभा लढवायची आहे.सुलक्षणा शिलवंत यांना विधानसभा लढवायची आहे. नाना काटे, राहुल कलाटे, प्रशांत शितोळे यांच्यासारखी मातब्बर मंडळी पदटवापात आघाडीवर राहणार आहे. आजी-माजी आमदार, शहराध्यक्षांना आपली पुढची पिढी राजकारणात आणायची आहे. पवार कुटुंबियांशी थेट संबंधित असलेल्यांची चलती राहणार आहे.
ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश
मग, अशा वातावरणात भाजपाच्या नाराजांना पदवाटपात संधी मिळणार का? हा प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही. आता महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली, असे गृहित धरल्यास प्रमुख तीन पदांसाठी पाच वर्षांत १५ जणांना संधी मिळणार आहे. उपमहापौर किंवा अन्य समितींच्या अध्यक्षपदी आणखी १५ जणांना संधी मिळेल, असे गृहित धरल्यास पाच वर्षांत मोठ्या पदांवर जास्तीत-जास्त ३० नगरसेवकांना संधी मिळेल. या ३० मध्ये पूर्वी राष्ट्रवादीत असलेल्या ३६ जणांना संधी मिळणार की भाजपातून पदासाठी राष्ट्रवादीत आलेल्यांना संधी मिळणार? हा खरा प्रश्न आहे. भाजपाकडून घरी चालून येणाऱ्या ‘एबी फॉर्म’ व पदनिश्चितीला टाळून अन्यायाचे कारण सांगून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे खऱ्या पॉलिटिकल वेटिंगचा अनुभव घेण्याची विनाशकाले विपरीत बुद्धी अनेकांना झाली, याची चिंता वाटते.
Read also:
- शिवाजी पार्क हे शिवाजी पार्क राहू द्या, त्याची स्मशानभूमी करू नका – प्रकाश आंबेडकर
- राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने; अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा कडाडून विरोध
- शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठी राहूद्या, राजकारणासाठी त्याचा बळी नको – मनसे
- म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर
- मोदींनी महाराष्ट्रातील मतदारांना कोविड सुपर स्प्रेडर म्हणणं हे धक्कादायक – सुप्रिया सुळे