मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद घेतलं नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत प्रवक्ते यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“सीतारमण यांची बारामतीत घराणेशाहीवर टिका, राष्ट्रवादीने भाजपची यादीच दिली”
एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात महिला आणि अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आलं नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अपक्ष आणि महिला आमदारांचा विचार केला जाईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. यातच खुप दिवसानंतर मंत्र्यांना पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलं. यावरून संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या, तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पद नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन असं म्हणत 50 खोके, एकदम ओके अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे.
“शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत”; मुख्यमंत्रीही संतापले
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपुर, वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. यावरून देखील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मी आख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे. त्यामुळे मला संपुर्ण महाराष्ट्र सांभाळण्याचा अनुभव आहे. हा गुरूमंत्र अजित पवारांना देखील देईन असं पलटवार फडणवीसांना अजित पवारांच्या टिकेला केला.
“तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही”?
दरम्यान, रविकांत वरपे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर देखील टिकेची धार चढवली आहे. ते म्हणाले की, दोन हाणा, पण मला मंत्री म्हणा! चा विशाल दृष्टिकोन बाळगणारे मिंधे सेनेचे कट्टर हिंदुत्ववादी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आवाहनाला सामान्य कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. मराठी तरुणांना मारामारीचे सल्ले आणि तरुणांच्या रोजगाराचे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ६ जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले. ही गोष्ट लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आधी म्हटले, मी सरकार सामील होणार नाही, नंतर उपमुख्यमंत्री झाले, नंतर गृहमंत्री सह ८-९ खात्याचे मंत्री झाले आणि आता चक्क सहा जिल्ह्याचे पालकमंत्री. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Read also
- “अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाहीत”; शिवसेनेचा शिंदे सरकारला कडक इशारा
- “महाराष्ट्रातील जनता आता उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेत नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
- “आमच्या नेत्यांवर शितोंडे उडवाल तर नागडा करून मारू;” तानाजी सांवतांचा बीडमध्ये हल्लाबोल
- “तर तुमचा धर्म घ्या अन् पाकिस्तानात चालते व्हा”; राज ठाकरेंचा इशारा
- सोसायट्यांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी ‘ नमो करंडक ‘ स्पर्धेचे आयोजन