पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बारामती मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण सध्या बारामतीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या असून त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सध्या बारामतीचं राजकारण राज्याच्या राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीकडून निर्मला सितारमण यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“महाराष्ट्रात कुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडणार नाही”; देवेंद्र फडणवीस
भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात असलेला पक्ष आहे. यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. देशात काॅंग्रेसने घराणेशाहीचे राजकारण केले. त्यामुळे जनतेने त्यांना दुर केले. आमचा लढा घराणेशाहीविरोधात आहे. अमेठी, रायबरेलीत गेल्या 50 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास आता भाजपच्या कार्यकाळात पूर्ण केला जात आहे. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणे हाच आमचा मुख्य हेतु आहे, असं निर्मला सितारमण म्हणाल्या.
PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी सीतारमण यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच त्यांनी भाजपमधील घराणेशाहींची यादीच वाचून दाखविली. घराणेशाहीवर टिका करताना निर्मला सीतारामन यांनी स्टेजवर आपल्याशेजारी कोण बसलंय. याची नीट माहिती घ्यायला हवी होती. स्टेजवरील जवळपास सगळेच नेते हे घराणेशाहीचे वारस आहेत. तुम्ही नाव ठेवता लोकांना, पण शेंबूड आपल्या नाकाला असा देखील टोला त्यांनी हाणला आहे.
“गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम
राणे, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, विजय गावित, ही मंडळी घराणेशाहीने आलेली नाही तर काय आंदोलनातून आलेली आहे का ? असा सवाल देखील त्यांनी भाजपला केला. पुढे बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, बारामती मतदारसंघाच्या विकासाचा बोलबोला आहे. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी काही भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येथे एकाच कुटुंबावर छप्परफाड सोने पडते आहे. माझ्याकडे बारामतीसह तेलंगणातील अन्य एका मतदारसंघाची जबाबदारी आहे. परंतु पक्ष जेव्हा जेव्हा सांगेल मी बारामतीला येणार आहे. येथील प्रत्येकाशी वैयक्तिक नाते निर्माण करणार आणि भाजपची ताकद वाढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
घराणेशाहीवर टीका करताना निर्मला सीतारामन यांनी स्टेजवर आपल्या शेजारी कोण बसलंय, याची नीट माहिती घ्यायला हवी होती. स्टेजवरील जवळपास सगळेच नेते हे घराणेशाहीचे वारस आहेत. तुम्ही नाव ठेवता लोकांना, पण शेंबूड आपल्या नाकाला!@BJP4India @BJP4Maharashtra @nsitharaman pic.twitter.com/p9wyEwi2Jq
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 24, 2022
राणे, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, विजय गावीत, ही मंडळी घराणेशाहीने आलेली नाही तर काय आंदोलनातून आलेली आहे का?@BJP4Maharashtra @nsitharaman
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 24, 2022
Read also
- “शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत”; मुख्यमंत्रीही संतापले
- “तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही”?
- “आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचं घड्याळ बंद पडणारच”
- राष्ट्रवादी, अन् आता भाजपच्या नेत्याचीही ठाकरेंना साथ; भाजप नगरसेविकेचा सेनेत प्रवेश
- “पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत”; नितेश राणे