पुणे : शिवसेना नेमकी कुणाची, तसेच निवडणुक चिन्हांबाबत येत्या 27 ऑक्टोंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच भविष्य यावर अवलंबून राहिलं आहे. जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागला तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी वर्तवली आहे.
“गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम
देशात सध्या सुरू असलेलं शिवसेनेचे प्रकरण भारतीय संविधानाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील राज्यपालांची भूमिका सध्या एक वेगळ्या प्रकाराची वाटत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एकदा राज्यपालांचे अधिकार ठरवायला सांगितले पाहिजेत. तसेच राज्यपालांना मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने वागायला पाहिजे. असं संविधानात देखील म्हटलं आहे. मात्र आताचे राज्यपाल अनेक वेळा निर्णय राखून ठेवतात. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रावर संकट..! अन् शिंदे सरकार दिल्ली वारी एन्जॉय करताहेत”
राज्यपालांच्या अधिकारांसोबतच विधानसभेच्या अध्यक्षांचे देखील अधिकार सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगितले पाहिजे. तसेच आमदारांना निलंबित करण्याचा अधिकार काही ठिकाणी अध्यक्षांना असतो तर काही ठिकाणी हा अधिकार राज्यपाल निवडणुक आयोगाच्या सल्ल्यानुसार करतात. तसेच ज्यावेळी अध्यक्षांवरच अविश्वास ठराव आला असेल तर त्याला फक्त अध्यक्ष म्हणून बसता येत नाही इतकंच घटनेमध्ये म्हटलं आहे. म्हणजे अध्यक्षांनी सगळं काम थांबवाव असं घटनेमध्ये म्हटलेलं नाही. असंही ते म्हणाले.
“अमित शहा, फडणवीसांना पुढेपण भेटणार”; भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, सुरूवातीला शिवसेनेमधून 16 लोक बाहेर पडलेत. ते एक तृतीयांश नाहीत. तसेच बाहेर पडल्यानंतर त्यांचं विलीनीकरण व्हाव लागतं. परंतु असं काही झालं नाही. ज्या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. जर मुख्यमंत्र्यांवरच कारवाई झाली तर त्यांना पुन्हा उभं राहता येणार नाही. त्यामुळे सरकारच कोसळेल. असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
Read also
- “आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचं घड्याळ बंद पडणारच”
- राष्ट्रवादी, अन् आता भाजपच्या नेत्याचीही ठाकरेंना साथ; भाजप नगरसेविकेचा सेनेत प्रवेश
- “पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत”; नितेश राणे
- “महाराष्ट्रात कुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडणार नाही”; देवेंद्र फडणवीस
- PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा