मुंबई : महिन्याभरापासून लम्पी आजाराने असंख्य जनावरे बाधित होत आहेत. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गुजरात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये लम्पी झपाट्याने वाढल्यानंतर त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाला. त्यामुळे याचा फटका दुग्धव्यवसायावर पडला असून अनेक जनावरे दगावले आहेत. यातच राजकीय मुद्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच दिल्ली दौरा केला आहे. यावरून काॅंग्रेसने त्यांच्यावर टिका केली आहे.
बाळासाहेबांचे विचार जिंकले..! दसरा मेळावा शिवतीर्थावरच
ज्याप्रमाणे कोरोनामुळे मनुष्य मोठ्या प्रमाणावर मृत्यू पावले त्याप्रमाणे लंम्पीमुळे शेतकऱ्यांच्या गाई मोठ्या प्रमाणात मरत आहेत. पंरतु महाराष्ट्राचे सरकार दिल्ली वारी एन्जाय करीत आहे. असा घणाघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. आपल्या बंडखोर आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
शिवतीर्थावर आवाज ठाकरेंचाच घुमणार; दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी मिळाली
राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निवडणुक चिन्हांवरून कोर्टात लढाई सुरू आहे. त्यावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी तसेच वेदांतावरून राज्यात जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेंनी अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
“यामध्ये काही फायदा नाही, तरीदेखील मोदींनी आमच्यासाठी..;” पंकजा मुंडे
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून संपुर्ण देशात लम्पी या आजारामुळे अनेक जनावरे दगावले आहे. लम्पी आजार संसर्गजन्य असून तो फक्त जनावरांना होत आहे. यामध्ये जास्त करून बैल आणि गायींवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. त्यावरून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काॅंग्रेसेने केली आहे.
Read also
- “अमित शहा, फडणवीसांना पुढेपण भेटणार”; भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण
- “मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील”; नितेश राणे
- “शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या”; सुळेंच्या त्या फोटोवरून राष्ट्रवादी आक्रमक
- “बीकेसीवर दसरा मेळावा अन् शिवाजीपार्कवर हसरा मेळावा”
- “ठाकरेंना मिळालेली परवानगी म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचा मुखभंग”; काॅंग्रेसने डिवचलं