बीड : आज बीड जिल्ह्यातील बहु प्रतिक्षित आष्टी- अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रतिम मुंडे आदि नेते उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. य़ावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्तधारी..!”
पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. ते आश्वासन आज पूर्ण झाल्याचे मुंडे यांनी म्हटलं आहे. या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नाही. असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्याचबरोबर हा मार्ग रेल्वे विभागासाठी फायद्याचा नाही. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यामुळे हा रेल्वमार्ग जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आल्याचे मुंडे म्हणाल्या. बीडच्या स्वाभिमानी माणसासाठी हा रेल्वेमार्ग भेट आहे. हा रेल्वेमार्ग मुंबई ते परळीपर्यंत व्हावा, अशी अपेक्षा देखील मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
“मशिदीवरील भोंगे, टोलनाके, आता राज ठाकरेंनी हाती घेतला नवीन मुद्दा” राज्य सरकारलाही दिला इशारा
माझ्यासह सबंध बीड जिल्हा वासीयांच्या जिव्हाळ्याची नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टीपर्यंत धावणार, याचा जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून मनस्वी आनंद आहे. यासाठी योगदान देणारे स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व.विलासराव देशमुख साहेब, बीड रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य यांचे स्मरण होते. स्व.विलासराव देशमुख साहेबांनी हा रेल्वेमार्ग गतीने पूर्ण व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असताना, या प्रकल्पाचा अर्धा खर्च केंद्राच्या बरोबरीने राज्य सरकार उचलेल, असा निर्णय घेतला होता, त्यामुळे निश्चितच या प्रकल्पाला गती मिळाली. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले..! रूपाली पाटील म्हणाल्या,” याला हावरेपणाची…”
सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वे मंत्री असताना आमच्या विनंतीवरून या रेल्वेमार्गाचे काम नगर व परळी यादोन्ही बाजुंनी गतीने सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र पुढे परळीच्या बाजूने या कामाची गती स्थिरावली आहे. या बाजूनेही पुन्हा वेगाने काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. आज नगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत असताना जिल्हा वासीयांना आनंद होत आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने या कामाला दोन्ही बाजुंनी गती देऊन संपूर्ण रेल्वे मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे व नगर ते परळी पर्यंत रेल्वे गाडी धावावी, यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत. बीडच्या आमच्या रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण निधीसह आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता कराल, अशी अपेक्षा देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
Read also
- “रावसाहेब दानवेंचा अधिकार फडणवीसांनी हिसकावला”; राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यावर टिका
- “मी खासदार आहे, कुठे बसायचं अन् कुठे नाही हे कळत मला”; व्हायरल झालेल्या फोटोवर शिंदेंचं स्पष्टीकरण
- “मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही”
- शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार? कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
- “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं