पुणे : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तळेगाव येथील जाहीर सभेत विरोधकांवर पुन्हा एकदा तोप डागली. त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला वेदांता प्रकल्पावरून पुन्हा एकदा सुनावलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे तळेगाव येथील खोटारडे आंदोलन असून खोटं बोल पण रेटून बोल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
“तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही”?
महाविकास आघाडी सरकारने जागा नक्की केली असेल तर एम ओ यू घेऊन आंदोलनाला यावे आणि त्याठिकाणी जागा संपादन केल्याचा शासन आदेश दाखवावा. त्याचबरोबर किती जागा आरक्षित केली त्याची माहिती द्यावी. त्याची प्रत कंपनीला दिलेली दाखवावी. असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावलं आहे.
“आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचं घड्याळ बंद पडणारच”
वेदांतसारख्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीमुळेच दिरंगाई झाली, सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता त्यातूनच तळेगावात इव्हेंट मॅनेटमेंट करीत आहेत. तळेगाव कुठे जमीन दिली आहे ते दाखवा. महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणारे जिथे असतील तेथून शोधून काढू. त्यांच्यावर देशद्रोह गुन्हे दाखल करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून आमचे सरकार संवेदनशील सरकार आहे. देशात अशा संस्था नको अशी मागणी अशा संघटनांना बंदी घातली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी, अन् आता भाजपच्या नेत्याचीही ठाकरेंना साथ; भाजप नगरसेविकेचा सेनेत प्रवेश
दरम्यान, दसरा मेळावा महापालिका विरूद्ध उच्च न्यायालयाचा आदेश आला असून त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. शिवाजी पार्कवर टोमने सभा होणार असून व्यक्तिगत चिखलफेक होणार आहे. अडीच वर्ष झोपले होते. आता महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांना सिरीयसली घेत नाही. असंही देखील ते म्हणाले.
Read also
- “आमच्या नेत्यांवर शितोंडे उडवाल तर नागडा करून मारू;” तानाजी सांवतांचा बीडमध्ये हल्लाबोल
- “तर तुमचा धर्म घ्या अन् पाकिस्तानात चालते व्हा”; राज ठाकरेंचा इशारा
- सोसायट्यांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी ‘ नमो करंडक ‘ स्पर्धेचे आयोजन
- “सीतारमण यांची बारामतीत घराणेशाहीवर टिका, राष्ट्रवादीने भाजपची यादीच दिली”
- “शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत”; मुख्यमंत्रीही संतापले