पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. याआधी आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र नरेंद्र मोदी हे देशासाठी वीस तास करणाऱ्या पंतप्रधानांपैकी एक आहेत. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किमंत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावे ठेवायची, मात्र आज मोदींमुळे जगात गौरव वाढला आहे. अशा शब्दात राज्याचे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५० वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं, पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही. आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे. त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे. असं देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“मंत्रिमंडळ विस्तार प्रश्न गरजेचा नाही, पण शिवसेना प्रहारमध्ये विलीन करू नका”
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. देशाचा स्वाभीमान जागृत झाला आहे. नाहीतर याआधी काहीच करण्यासारखे नाही. यांच्या पद्धती खराव, हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता. परंतु आमचा इतिहास गौरवशाली आहे. अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटिशांनाही या देशाने धुळ चाखली आहे. आज मोदींमुळे देश जागृत आहे. असंही म्हणाले.
“मविआ सरकारचे निर्णय का बदलले? कोर्टात तरी खरं सांगा”; राष्ट्रवादीचा शिंदेंना सवाल
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर राज्यातील राजकीय नेते देखील प्रखर पणे टिका करताना दिसत आहेत. अलिकडेच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांनी माफी देखील महाराष्ट्रातील जनतेची मागीतली.
Read also
- यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
- निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
- “आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाहीत, त्यांनी थांबून तुम्हाला ठोकलं असतं”
- फडणवीसांचा दिल्ली दौरा, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नाही, अंतर्गत कलह अटळ
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली