मुंबई : राज्यात इतकं मोठ बंड आम्ही केलं. या बंडामध्ये थोडा जरी आम्हाला दगाफटका झाला असता तर शहिद होण्याची वेळ आली असती. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील दौऱ्याच्या वेळी केलं. त्यावर आता राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
“रात्री दोन-तीन तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, त्याचा उपयोग महाराष्ट्राने करून घेतला पाहिजे”
विद्या चव्हाण यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अमर तरी झाला असता महाराष्ट्रासाठी. बाळासाहेबांसाठी. अगदीच नाही तर आनंद दिघेंसाठी. अमरतेचं उदात्तीकरण तरी करता आलं असतं. परंतु आता तर बळी कधी केव्हा. कसं जालं हेही कळणार नाही. खास शैली आहे, भाजपची. भाजप है तो मुमकीन है. मनसुख चे काय झाले?
“आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
आम्ही बंड केलं. ती लढाई काही छोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. तशी कठीणही होती. एककीडे सरकार सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असं वाटत होतं. दगा फटक्यात धोका होता. अशावेळी थोडं जरी इकडं तिकडं झालं असतं तर शहीदच झालो असतो असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.
“नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी माझं मुळ गाव अजूनही विसरलो नाही. त्यामुळे माझ्या मुळ गावी आलो आहे. जनतेचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून मला गहिवरून आलं आहे. माझ्या गावी आलोय. साताऱ्याचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. असं देखील ते म्हणाले.
“शहीद झाला असता”तर..!”अमर तरी झाला असता”..!”महाराष्ट्रासाठी”..!” बाळासाहेबांसाठी”..!अगदीच नाही तर “आनंद दिघेंसाठी”.!”अमरतेच” उदात्तीकरण तरी करता आलं असतं..!पण आता तर..बळी..कधी, केव्हा,कसे जाल हेही कळणार नाही..! खास शैली आहे भाजपाची..! भाजपा है तो मुमकिन है..!’मनसुख’ चे काय झाले.?
— Vidya Chavan (@Vidyaspeaks) August 13, 2022
Read also
- शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
- मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
- “शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- “सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;
- “ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे दादरलाच उभारणार प्रति शिवसेना भवन”