कोलेहापुर : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासुन ते सातत्याने दौरे करत आहेत. काही ठिकाणी ते कार्यक्रमांना मध्यरात्री हजेरी लावत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे यांच्या रूपाने रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. तसचं राजकारण थोडं बाजूला ठेवून त्याचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे, असं म्हणत कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी एकनात शिंदे यांचं कौतुक केलं आहे.
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना यापेक्षाही…;”
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या पॉपर्टीसाठी आम्ही बंडखोरी केली असा आरोप विरोधकांकडून आमच्यावर झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाणे हा त्यांचा विचार होता का? आपल्या मूळ पक्षासाठी केलेला आम्ही हा उठाव केला आहे. आम्ही कोणतीही वस्तू बळकवण्याचा प्रयत्न केलेला नाही. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्यामुळे ते कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी केलेला हा घोटाळा मुंबईतील एका मोठ्या घोटाळ्यांपैकी एक आहे. राऊत यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत, असा दावा देखील त्यांनी केला.
“100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”
आमचे सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही. अजून विभागांचे वाटप झाले नाही, कोणतं खातं कोणाला मिळणार हे माहीत नाही. लवकरच खातेवाटप होणार आहे. काल छत्रपती घराण्याच्या वंशज उद्यनराजे आणि संभाजीराचे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या आहेत. राज्यातील देवस्थानाचे पावित्र्य राखलं पाहिजे, भाविकांना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न शिंदे करकार करणार आहे, असंही केसरकर म्हणाले.
“आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप
दरम्यान दिपक केसरकर यांनी काल माजी खासदार संभाजी राजे आणि खासदार उदयन राजे यांची भेट घेतली. त्यावर बोलताना ते म्हणाले की, काल छत्रपती घराण्याच्या वंशजांची भेट घेतली, त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. अजून विभागांचे वाटप झाले नाही, कोणतं खातं मला मिळणार हे माहीत नाही. सिंधुदुर्ग हा सगळ्यात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण झाला आहे. राज्यातील देवस्थानाचे पावित्र्य राखलं पाहिजे, भाविकांना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे.
Read also
- “आता आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे, ते मला पुढे कॅबिनेट मंत्रिपद देतील”; संजय शिरसाठ
- “नको ते व्हॉट्सअप, नको ते फेसबुक, नको ते ट्विटर”; त्या वक्तव्यावरून संजय शिरसाठांचं सारवासारव
- “उद्धव ठाकरेंबाबत चुकीचं वक्तव्य येणार नाही, भावनिकरित्या कुटुंबांशी जोडलोय”; धैर्यशीलराव माने
- “काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
- “आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर