कोल्हापुर : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या मतदार संघाची तसेच संपुर्ण महाराष्ट्राची समस्या आणि भूमिका, मांडली. त्यानंतर आता आपल्या मतदार संघात परत जात असताना लोकभावनेने आपली भूमिका समजून सांगणार आहे. तसेच माझी बांधिलकी माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांशी आहे. त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व खासदारांनी भूमिका घेतली आहे. असं मत शिवसेनेचे हातकांकले मतदार संघातील खासदार धैर्यशील राव माने यांनी म्हटलं आहे.
“जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”
एकनाथ शिंदे गटात जाण्याअगोदर आम्ही सर्व खासदारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याठिकाणी सर्व बाराच्या बारा खासदारांनी आपल्या मतदारसंघातील व्यथा, तसेच लोकसभेच्या निवडणूकीत भाजप आणि शिवसेना युतीमधून निवडून आल्याचं सांगितलं. आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनैसर्गिक युती आहे. तेच आम्ही मागील अडीच वर्षापासून सांगत आलो आहे. तसेच जो काही गट निर्माण झाला आहे. तो उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही तर महाविकास आघाडीच्या युतीविरोधात झाला आहे. असं देखील धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.
“मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”
शिवसेनेमध्ये जात असताना भावनिक रित्या या कुटुंबांशी जोडलो गेलो आहे. भविष्यात कधीही उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्याबद्दल चुकीचं वाक्य माझ्या तोंडून येणार नाही. एखाद्या मुलाला आपलं घर नाइलाजस्तव आपलं घर सोडवं लागतं. तीच मनस्थिती आमच्या आमदार आणि खासदारांच्या मनामध्ये होती. या कुटुंबाला कधीही दृष्ट लागू नये हाच आमचा प्रयत्न होता. असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
“असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणांमधून या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी या आमदारांचा वारंवार गद्दार म्हणून उल्लेख देखील केला.
Read also
- “काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप असणारा नगरसेवक राष्ट्रवादीत”
- “आता गावोगावी गुलाल उधळणार, 608 ग्रामपंचायतींमध्ये जनता सरपंच निवडणार” निवडणुका जाहीर
- पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना यापेक्षाही…;”
- “100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”
- “आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप