मुंबई : राज्यातील 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर ला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासुन आचारसहिता लागू करण्यात आली आहे. 18 सप्टेंबरला मतदान तर 19 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस.मदान यांनी आज केली. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात निवडणुका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
सर्वोच्च न्यायलयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेल्या 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्पयावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असा आदेश ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
“बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. 27,28 आणि 31 ऑगस्टला शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. तर मतदान 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीत प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशी माहिती मदान यांनी दिली आहे.
बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
महाराष्ट्रातील जिल्हातील निवडणुक
नंदुरबार : शहदा 74 व नंदुरबार 75
धुळे : शिरपूर 33
जळगाव : चोपडा 11, यावल 02
बुलडाणा : जळगाव (जामोद)01 संग्रामपूर 01, नांदुरा 01, चिखली 03 व लोणार 02
अकोला : अकोट 07, बळापूर 01
वाशीम : कारंजा 04
अमरावती : धारणी 01, तिवसा 04, अमरावती 01 व चांदुर रेल्वे 01
यवतमाळ : बाभुळगाव 02, कळंब 02, महागाव 01, आर्णी 04, घाटंजी 06, केळापूर 25, राळेगाव 11 , मोरगाव 11 व झरी जामणी 08:
नांदेड : माहूर 24, किनवट 47, अर्घापूर 01, मुदखेड 03, नायगाव 04, लोहा 05, कंधार 04, देगलूर 01
हिंगोली : औंढा नागनाथ 06
परभणी : जिंतुर 01 व पालम 04
नाशिक : कळवन 22, दिंडोरी 50, नाशिक 17
पुणे : जुन्नर 38, आंबेगाव 18, खेड 05 व भोर 02
अहमदनगर : अकोला 45
Read also
- पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना यापेक्षाही…;”
- “100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”
- “आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप
- “जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”
- “मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”