मुंबई : भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला जातो. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना पक्षातील पदे सोडावी लागणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र, आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वांचे लक्ष खाते वाटपाकडे असून, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत होणार आहे. तसेच पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीचे वाटप देखील करण्यात येणार आहे. कारण 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडावंदन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे राज्यातील किमान 18 जिल्ह्याच्या ठिकाणी तरी पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा वंदन होण्यासाठी तातडीने पालकमंत्री व खातेवाटप होईल, असे सांगण्यात येत आहे.
“उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात 18 मंत्र्यानी शपथ घेतली मात्र यामध्ये एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर जोरदार टिका केली आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे, तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही महाविकास आघाडीचं सरकारने पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा 5 मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही. असंही ते म्हणाले.
“पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय नेते तयारी करताना दिसत आहेत. यातच आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महाराष्ट्रा राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्टपासून घेण्याचं ठरवलं आहे.
Read also
- “..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”