अमरावती : भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना क्लिन चीट हेच का मोदींचे स्वच्छ भारत अभिमान, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातुन करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता 75 वर्षात पहिल्यांदाच देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले आहेत. देशात पैशांचा गैरवापर आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करत आहेत, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
“तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल
75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभलेले आहेत. म्हणुन भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या लोकांवर कारवाई होत आहे. यावर टीका करणाऱ्या लोकांना दुसरे काही कामच उरले नाही. देशात पैश्यांचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्याच्यावर कारवाई पंतप्रधान करत आहेत. गोरगरिब लोकांच्या पैशाची जर कोणी नासाडी करत असेल आणि स्वत: संपत्ती जमवत असेल तर त्यांच्यावर पंतप्रधान कारवाई करत आहेत, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
“महाविकास आघाडीत फूट पडणार”?नाना पटोलेंच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं सुचक वक्तव्य
जेव्हा त्यांची महाविकास आघाडी होती तेव्हा मुख्यमंत्री घारतुन बाहेर निघाले नव्हते. जे महाविकास आघाडी सरकार चालवत होते तेच आताही त्यांना चालवत आहेत. जे लोक महाविकास आघाडीतुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या भावना कधीच दुखवल्या होत्या पण मजबुरीने दुकान उगडले होते म्हणुन त्यांना बंद करायची कोणाची इच्छा नव्हती, असं म्हणत राणा यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहेे. आम्ही कधी मंत्रिपदासाठी काम केलेले नाही. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सोबत होतो आणि कायम राहणार आहे. मंत्रिपदाची अपेक्षा कधी केली नव्हती आणि मागणी सुद्धा कधी केली नाही, असंही राणा म्हणाल्या.
गुगलचा अजब पराक्रम; शिंदे गटातील आमदार भारतीय जनता पक्षात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच महिन्यात जे काही निर्णय घेतले आहेत तेवढे निर्णय महाविकास आघआडी सरकारने अडीच वर्षात देखील घेतले नाहीत. खाते वाटप कश्या प्रकारे होणार कधी होणार याची चित्ता विरोधी पक्षातीन नेत्यांनी करू नये. महारष्ट्राला कोणत्या गोष्टीची गरज आहे, महाराष्ट्रा्च्या विकासासाठी काय झालं पाहिजे याविषयी विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलायला पाहिजे, असा टोला देखील राणा यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.
Read also
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”
- “पत्नी, मुलगा नाही तर ड्रायव्हर किंवा चमच्यासाठीही आता नेते उमेदवारी मागतात”; गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान
- “उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
- “पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
- “तर या बिनखात्याच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काय उपयोग?” काॅंग्रेसचा तिखट सवाल