मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे विरोधी पक्षाकडून टीका होत असताना आता गुगलने शिंदे गटातील चार मंत्र्यांना भाजपमध्ये असल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे आता याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे, उद्य सामंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड या मंत्र्यांच्या नावापुढे भारतीय जनता पार्टी असं दाखवण्यात आलं आहे.
“फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
भाजपमध्ये दाखवलं असणाऱ्या मंत्र्यांनी दोन दिवसांपुर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता गुगलने त्यांचा पक्षच बदलाला असल्याचं समोर आलं आहे. हा खोडसाळपणा कुणी केला असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
“भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
राज्य परीक्षा परिदेअंतर्गत शिक्षकांसाठी बंधनकारक असलेल्या टीईटी 2019 या वर्षीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. या परिक्षेत जवळपास 7 हजार 850 अपात्र विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र देऊन पास करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आले आहे. ऐनवेळी टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने त्यांचं मंत्रिपद जाणार अशी चिन्हे दिसत होती मात्र आता अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
“मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
Read also
- “महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये बनवलीय, ती तुटू शकते”
- लढणार, भिडणार, आणि जिंकणार; विरोधी पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर आंबादास दानवेंचं जंगी स्वागत
- “अधिवेशन आहे का थट्टा”; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचा टोला
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड