मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन 17 ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या अधिवेशन बैठकांची दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली. या दिनदर्शिकेवरून अधिवेशन आहे का थट्टा, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवास सरकावर लगावला आहे.
“दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. 17 ऑगस्टला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे व सन 2022-23 च्या पुरवणी मागण्या सादर करण्याचं काम अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चालणार आहे. 18 ऑगस्टला संपुर्ण दिवस शासकीय कामकाजासाठी वेळ दिला जाणार आहे. तर 19 ऑगस्टला गोपाळकाला (दहिहंडी) निमित्त सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. याचबरोबर 20 आणि 21 ऑगस्टला शनिवार रविवार असल्यामुळे अधिवेशनाला सुट्टी असणार आहे.
“मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
22 ऑगस्टला 2022-23 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान होणार आहे. 23 ऑगस्टला या दिवशी पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान होणार आहे. यासोबतच पुरवणी विनियोजन विधेयक 2022 यावर कामकाज होणार आहे. 24 ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम होणार आहे. 25 ऑगस्टला संपुर्ण दिवस शासकीय कामकाज होणार आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
मागील अनेक दिवसांपासून राज्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी प्रचंड नुकसानीला तोंड देतोय. मराठवाड्यात गोगलगायींचे संक्रमण वाढले आहे. राज्यात सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. राज्यातील पूरग्रस्त जनतेच्या मदतीला हे सरकार अजून गेलेले नाही. त्यासोबतच महागाईचा सर्वात मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन लांबवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
Read also
- “..तर राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही”; शहाजी पाटलांचा राठोडांना पाठिंबा
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
- “फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
- “भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
- “मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा