मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दूर करत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला बिहारमध्ये दणका बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडत राष्ट्रीय जनता दलाच्या सोबत हातमिळवणी करत भाजपला दणका दिला आहे. महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही राजकीय उलथापालथीने संपुर्ण देशाचं लक्ष वेधुन घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
नितीश कुमार यांनी वावटळ निर्माण केली आहे मात्र त्याचे वादळ झाले तर आव्हानात्मक स्थिती निर्माण होईल. ईडी आणि सीबीआय देखील नितीश कुमार यांना रोखु शकली नाही. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारण कोणीच कायमचं संपत नसते हे खरं, पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे. समझने वालों को इशारा काफी है, असं म्हणत शिवसेनेने भाजपला डवचले आहे.
“शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
बिहारच्या बदलेल्या समीकरणांच्या आधारे शिवसेनेनं थेट 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं गणित मांडलं आहे. देशातील विरोधी पक्षाने नितीश कुमार यांचे स्वागत केले पाहिजे. ईडी चा धाक, कपट कारस्थानाने महाराष्ट्राचे सरकार पाडले, पण बिहारात नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेपासुन दुर फेकले आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र राहिले तर लोकसभा निवडणुकीचं चित्र बदलू शकतं, असा दावा सामनातुन करण्यात आला आहे.
“आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून वारंवार निशाणा साधला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं उदाहरण देत शिवसेनेने पुन्हा शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. केद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूचे राज्यसभा सदस्य आर.पी. सिंग यांचा समावेश करत सिंग यांना बळ देऊन भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांना अस्थिर करायचे होते. मात्र हे समीकरण नितीश कुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी दिल्ली संपर्क तोडला आणि तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवत पुन्हा सरकार स्थपन केले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघे टेकू मुख्यमंत्र्यांनी हा बाणा समजून घेतला पाहिजे, असा टोला शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आहे.
Read also
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका
- वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
- “तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
- “शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल