मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच ओबिसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अजुन सुटला नाही. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण केले होते, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या पुर्ण करणार असल्याचं म्हटलं होतं. आता शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
“फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”
मराठा समाजातील गरीब, वंचितांना आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाला सामाजिक मागासत्व सिद्ध करावे लागले. त्यासाठी रिव्हिव पिटिशनच्या मागे लागले पाहिजे जी वर्षे झाले तरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व काही माहित आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बैठक बोलवावी, अन्यथा स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लढा उभारावा लागेल, असा इशारा कोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे.
मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
गरीब, वंचित मराठ्यांना आरक्षणा द्या अशा आमची मागणी आहे. 1902 मध्ये शाहू महाराजांनी त्याकाळी बहुजनांना आरक्षण दिले होते. जोपर्यंत मराठा समाज आपले सामाजिक मागासत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी चर्चेला मी तयार आहे. आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांनी आरक्षण रद्द केलेले आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागेल, असं संभाजीराजे म्हणाले.
फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू
समाजाला सामाजिक मागासत्व सिद्ध करावे लागेल, त्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून ही प्रक्रिया परत सुरू करावी लागणार आहे. सामाजिक मागास आहे हे सिद्ध करताना रिव्हिव पिटिशनच्या मागे लागेले पाहिजे. जी सर्वोच्च न्यायालयात आहे, वर्षे झाले त्याचा निकाल झालेला नाही. त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यत सामाजिक मागासत्व सिद्ध करता येणार नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.
Read also
- “शिवसेनेवर टीकी करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
- “शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
- “आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
- “उशिरा आलेल्यांना पहिल्या पंगतीत अन् पहिले जे आले त्यांना शेवटी”; मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची नाराजी