मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अलिकडेच करण्यात आला. मात्र त्यानंतर लगेचच भाजपप्रणित आघाडी असलेल्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजपसोबतची युती तोडली. त्याचबरोबर बिहारमधील भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी शिवसेनेला महाराष्ट्रात संपवलं असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
“शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना विधानसभेच्या निवडणुका लढली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत जात सत्ता स्थापन केलं. अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केला आणि भाजपसोबत युती करत त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. यावरून भाजप शिवसेना फोडण्याचं काम करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
“आमच्यासोबत खरी शिवसेना, त्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला”
रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या सर्व घटनांवरून रामदास आठवले यांनी देखील भाजपसोबतची युती तोडावी असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, भाजपने मित्रपक्ष शिवसेना, जेडूयु यांनी भाजपची मैत्री तोडली आता रामदास आठवले आपण सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीविरोधी भाजपची मैत्री तोडावी असं म्हटलं आहे.
दरम्यान, सुशील कुमार मोदी यांनी महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचं काम आम्ही केलं असल्याचं म्हटलं. त्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपवर याप्रकरणावरून टिका केली आहे.
भाजपचे मित्रपक्ष #शिवसेना, #JDU यांनी भाजपाची मैत्री तोडली आता आदरणीय #रामदास_आठवले आपण सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचविण्यासाठी लोकशाहीविरोधी भाजपाची मैत्री तोडावी.. सचिन खरात #MaharashtraPolitics@abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive @mataonline @Dainik_Prabhat
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) August 11, 2022
Read also
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका
- वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
- “तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
- “शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”