मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांना देखील स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्यावर पुजा चव्हाण आत्महत्या आरोप ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असतांना त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा शिंदे सरकारमध्ये वर्णी लागली आहे. यावरून आता विरोधी पक्षाने त्यांच्याविरोधात रान पेटवलं आहे.
“मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
राजकारणात अनेकवेळा नेत्यांवर वेगवेगळे आरोप होत असतात. संजय राठोड यांच्यावर जे आरोप झाले होते त्याप्रकरणात पोलिसांना त्यांना क्लिनचीट दिली आहे. एखादा आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्याला क्लीनचीट दिली असेल तर त्याचं राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही एकनाथ शिंदे यांनी राठोडांबाबत जो निर्णय घेतला तो न्याय देणारा आहे. असं बंडखोर आमदार शाहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो, ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांना आज पवित्र दिनी मंत्री झाल्यावर वंदन करावं म्हणून आज या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
“केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
दरम्यान, पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने संजय राठोड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यावेळी भाजप नेत्या चित्रा यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरावे देणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते.
Read also
- “८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊनच काम केलं”; संजय राठोड
- “फक्त मंत्रिमंडळाची चिंता; महाराष्ट्रातील जतनेला त्यांनी वाऱ्यावर सोडलंय”
- “भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
- “मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
- “दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त