मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट पासुन सुरू होणार आहे. राज्यात सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. राज्यातील पूरग्रस्त जनतेच्या मदतीला हे सरकार अजून गेलेले नाही. त्यासोबतच महागाईचा सर्वात मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन लांबवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
“केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
मागील अनेक दिवसांपासून राज्यात पूर आहे. अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी प्रचंड नुकसानीला तोंड देतोय. मराठवाड्यात गोगलगायींचे संक्रमण वाढले आहे. यात दहा-बारा वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यावेळी मदत मागण्याची गरज होती. मात्र मदतीसाठी एक बैठकही झाली नाही. त्यांना फक्त मंत्रिमंडळ स्थापनेची चिंता होती. महाराष्ट्रातील जतनेला वाऱ्यावर सोडून यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफची टीम प्रत्येक ठिकाणी तैनात करणे गरजेचे आहे. आता राज्य सरकार सत्कार आणि सोहळ्यातून मोकळे होऊन संकटात असलेल्या राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेलं पिकांचं, घरांचं, शेतजमिनींचं नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचं, त्यांना अधिक गाळात घालण्याचं काम केलं आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हटले आहे.
Read also
- “भावना गवळींनी मोदींना राखी बांधली, अन् इडीची कारवाई टळली”
- “मंत्रिपदासाठी फडणवीसांकडे कधीही मागणी करणार नाही”; रवी राणा
- “दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
- “मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा