जालना : जालना शहरात आयकर विभागाने चार स्टील कारखानदारांवर धाड टाकली. या धाडीत आयकर विभागाने तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता ताब्यात घेतली. आयकर विभागाने कारखानदारांच्या कारखान्यावर, घरांवर आणि कार्यालयावर छापे टाकत हा मुद्धेमाल जप्त केला असल्याचं समजत आहे. या धाडी साठी ज्या वाहनांचा वापर करण्यात आला त्या वाहनांवर “दुल्हन हम ले जायेंगे..” असा बोर्ड आयकर विभागाकडुन लावण्यात आला होता.
“तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
आयकर विभागाने जालन्यात केलेल्या कारवाईत 58 कोटींची रोकड आणि 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तर 390 कोटींची बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबादमधील लॅंड डेव्हलपर व व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याचं सांगितले जात आहे. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल 13 तास लागले तर ही कारवाई 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान सुरू होती. या कारवाईसाठी राज्यभरतील 260 कर्मचारी 120 वाहनातुन जालन्यात पोहोचले होते.
“शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
जालना शहरातील चार स्टील कारखानदारांनी कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न व्यवसायातुन मिळवत प्राप्तिकर बुडवला असल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात 1 ऑगस्टला वेगवेगळ्या वाहनातून जाऊन स्टील कारखानदारांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानावर छापे टाकले. एकाच वेळी पाच वेगळ्या पथकाने कारवाई केली . मात्र सुरूवातील काहीच हाती लागले नाही. त्यामुळे पथकाने त्यांच्या शहराबाहेरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे अडगळीत काही पिशव्यांत रोकड सापडली.
“एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
चार स्टील व्यवसायिकांपैकी तीघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले. सोम्याच्या 32 किलो दागिन्याची किंमत बाजारभावानुसार 16 कोटी रुपये आहे. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बॅकांतील ठोवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली. यामध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला आहे.
Read also
- “मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका
- वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची