मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्याच 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार महिलांना देखील संधी दिली जाईल, अशी प्रतिक्रिया अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात अपक्ष आमदारांना संधी न दिल्याने अपक्ष आमदार नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सरकार चालवलं. परंतु एकनाथ शिंदे यांनी एक दोन महिन्यात संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. एकनाथ शिंदे यांचं मजबुत सरकार राज्यात स्थापन झालं आहे, हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे. असंही ते म्हणाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा अर्धाचा विस्तार केला आहे. त्यामध्ये अतिशय चांगले नेते मंत्री म्हणून निवडले आहेत. पुढच्या टप्प्यात महिलांना देखील संधी जाईल. असंही रवी राणा यांनी म्हटलं.
“तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ मी कधीही मंत्रीपदाची मागणी केली नाही. त्यांना यासर्वांची जाण आहे. ते सक्षम नेतृत्व असून अमरावती जिल्ह्यात कोण मंत्री असायलं हवं. त्यांना ते माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की कोणीही अपक्ष आमदारांनी नाराज होऊ नये, मी देखील नाराज नाही. कारण महाराष्ट्रा हा थांबला होता. जनतेला न्याय देण्यासाठी मजबुत सरकार पुढं आलं आहे. असंही ते म्हणाले.
“शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं हनुमान चालिसाचं ट्रेंड चालवला होता. ज्याठिकाणी राणा दाम्पत्य जात होते. त्या त्याठिकाणी त्यांच्याजवळ हनुमान चालिसा होती. यावरून आता हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा ,हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा, अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने”देवेंद्र चालीसा” वाचण्याची गरज आहे. रवीराणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read also
- “दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
- “मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका